राग का व कसा
माणसाच्या आयुष्यात राग नावाचा शब्द किंवा भावना जर नसेल तर कसं असेल आपले आयुष्य कल्पना करून पाहा राग जर कुणाला आलाच नसता तर सगळेच एकमेकांशी गोड वागले असते आणि त्या गोड आणि चांगल्या वागण्याला काही किमतच राहिली नसती. कारण प्रत्येक वाईट गोष्टी मुळे चांगल्या गोष्टीची किंमत वाढते राग हा प्रमाणात असेल तर तो खरच चांगला आहे. आलेल्या रागाचाही उपयोग होतो याच एक उदाहरण सांगतो. एक सर्वसाधारण 40 ते 45% मार्क घेणाऱ्या मुलाला एकदा सर खूप रागावतात त्याचा खूप अपमान करतात त्यामुळे त्या मुलाला त्या सरांचा प्रचंड राग येतो. आणि तो मुलगा सरांना रागारागाने म्हणतो 80% मार्क घेऊन दाखवतो. त्या मुलाने त्याला आलेल्या रागाचा असा उपयोग करून घेतला. माणसांच्या आयुष्यातील खूप समस्या या विनाकारण व्यक्त केलेल्या रागमुळे आणि कधीही न केलेल्या प्रेमामुळे निर्माण होतात.योग्य वेळी राग व्यक्त कर. योग्य वेळी प्रेमही व्यक्त करता आले पाहिजे. थोड्या प्रमाणातील राग हा वा...